'मुंबईकर सुज्ञ आहेत ते नेहमी आमच्या पाठीशी'

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली
rane
ranerane
Summary

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली

मुंबई: बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत आहे, त्यांच्या विचाराने मुख्यमंत्री राज्याचा कारभार चालवत आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्यात उत्तमपणे काम करत आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, मात्र कोविडची स्थिती लक्षात घेता नियम पाळले पाहिजेत, असा टोला मंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपच्या जनआशिर्वाद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लगावला. मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाचा जनआशिर्वाद मोर्चा सुरू असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाली होती.

मंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईकर सुज्ञ आहेत, मुंबईवर जेंव्हा-जेंव्हा संकट आलं, तेव्हा संकटकाळी कोण धावून येतं हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचीही चिंता नाही, असा टोला नारायण राणेंच्या 'मुंबई जिंकायची आहे' यावर लगावला आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com