
पाली : सुधागड तालुक्यातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा उपोषण करण्याची वेळ आली आहे. सोमवारी (ता. 9) पासून चिंतामण पवार पाली तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणसाठी बसले आहेत. दरम्यान आज बुधवारी (ता. 11) उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही.