APMC:क्विंटलमागे १५० रुपयांची लूट ! आर्वीतील शेतकऱ्यांचा आरोप, कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र गप्प

आर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी एकत्र येत खरेदी सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांची क्विंटलमागे सरसकट १५० रुपयांनी लूट होत आहे. असे असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र गप्प आहे.
apmc
apmcsakal media

Farmers Exploitation: आर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी एकत्र येत खरेदी सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांची क्विंटलमागे सरसकट १५० रुपयांनी लूट होत आहे. असे असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र गप्प आहे. शेतकऱ्यांच्या नाडवणुकीला बाजार समिती पाठिंबा देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा असून मनीष उभाड यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार करण्यात आली आहे.

येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. २७) व्यापाऱ्यांनी एकजूट करून सुमारे ४ हजार ५०० रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली. सजग शेतकऱ्यांनी धामणगाव, अमरावती आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांसोबत संपर्क साधून भाव विचारला असता तेथील शेतकऱ्यांना ४ हजार ६०० ते ७०० सरसकट भाव मिळाल्याची माहिती मिळाली.

बिजवाई व एफएक्यू मालाच्या भावातसुद्धा १०० ते १५० रुपयांची तफावत असल्याचे कळले. याचाच अर्थ असा की, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल १०० ते १५० रुपयांनी शेतकऱ्यांना नाडविले. त्या दिवशी सुमारे तीन हजार क्विंटल शेतमालाचा लिलाव झाला. यातून लाखो रुपयांनी शेतकरी लुटल्या गेले. मात्र, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने याची दखल घेतली नाही.

मनीष उभाड यांनी ही बाब सचिव श्री. कोठेवार व संचालक लखन अग्रवाल यांच्या लक्षात आणून दिली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बाजार यार्ड परिसरातील जागा व्यापाऱ्यांना विकण्याचे काम बंद करावे, त्या जागा ताब्यात घ्याव्या व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी मनीष उभाड, अतुल लीलाधर शेंडे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. (Latest Marathi News )

apmc
Maratha Reservation : नोंदीनुसार आरक्षण घेणार नाही; मनोज जरांगे पाटील

आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार म्हणाले की, "आर्वी बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली आहे. बाहेरगावाहून शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतमाल पाहूनच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव दिला जात आहे."

शेतकरी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष मनीष उभाड म्हणाले की, " शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन प्लॉट व्यावसायिकांना आमंत्रित करावे. मालाची आवक वाढली की इतर बाजार समितीच्या तुलनेत आर्वी बाजार समितीत सोयाबीन उत्पादकांना कमी भाव मिळतो. बाजार समितीच्या संचालक मंडळातर्फे सचिवाने केलेल्या अपहाराची चौकशी सुरू आहे. बाजार समितीत सचिवांचा कारभार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होय." (Latest Marathi News)

apmc
Maratha Reservation: मनोज जरांगेंना मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा; एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com