पाण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतोय, लाज वाटूदे; देशाला कृषीप्रधान का म्हणता? बहिणीचा केंद्रीय मंत्र्यांना सवाल

Kailas Nagre Suicide : बुलढाण्यात राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं शेतीला पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केली. त्याच्या रक्षाविसर्जनावेळी बहिणीने केंद्रीय राज्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले.
Kailas Nagre Suicide
Kailas Nagre Suicide Esakal
Updated on

हक्काचं पाणी मिळावं यासाठी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केली. कैलास नागरे असं तरुण शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या बहिणीने केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना मारण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय का? शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा आमदार-खासदार मंत्री कुठं असतात. शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतोय तरी आपला देश कृषीप्रधान असल्याचं सांगत का मिरवता असा सवाल कैलास यांची बहीण सत्यभामा यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना विचारलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com