बळीराजाची थट्टा! नुकसान भरपाईपोटी दिले ३ रुपये, शेतकरी संतापले

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मदत देण्यात आलीय. यामध्ये काही शेतकऱ्यांना ३ रुपये, ५ रुपये ते २१ रुपयांपर्यंत मदत देण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय.
Akola Farmers Receive Rs 3 Compensation Under PM Crop Insurance Scheme

Akola Farmers Receive Rs 3 Compensation Under PM Crop Insurance Scheme

Esakal

Updated on

अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार आता समोर आला आहे. अकोल्यातली काही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई म्हणून फक्त ३, ५, ८ आणि २१ रुपये अशी मदत देण्यात आलीय. थट्टा करणाऱ्या या नुकसानभरपाईच्या मदतीनंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्या रकमेचे धनादेश पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना परत केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com