

Akola Farmers Receive Rs 3 Compensation Under PM Crop Insurance Scheme
Esakal
अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार आता समोर आला आहे. अकोल्यातली काही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई म्हणून फक्त ३, ५, ८ आणि २१ रुपये अशी मदत देण्यात आलीय. थट्टा करणाऱ्या या नुकसानभरपाईच्या मदतीनंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्या रकमेचे धनादेश पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना परत केले आहेत.