

Maharashtra Government Decision Farmers Soil Royalty Exemption
esakal
Maharashtra Farmers Soil Royalty Exemption : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा गाळ, माती आणि मुरूम काढताना यापुढे शासनाला कोणतीही रॉयल्टी (स्वामित्व धन) भरावी लागणार नाही. शेतीची सुधारणा, विहीर, गोठा, शेतघर बांधकाम तसेच शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी या गौण खनिजांचा वापर करण्यास शासनाने परवानगी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णयही तत्काळ जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ही घोषणा केली.