राज्यात उष्माघाताच्या पाचशेवर रुग्णांची नोंद

यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत २९ मृत्यू
Heat stroke
Heat strokeSakal

मुंबई - राज्यात यंदा उन्हाळा चांगलाच तापला आहे. तापमानाचा पाराही वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांसह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात उष्माघाताच्या एकूण ५४३ रुग्णांची नोंद झाली असून २९ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १ मार्च २०२२ पासून आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघाताने २९ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. ही संख्या गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. गेल्या दोन महिन्यांत ५४३ उष्माघाताचे रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४१९ रुग्णांची नागपुरात नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर १६८, अकोला ४४, पुणे २७, नाशिक १७, औरंगाबाद १५, सोलापूर २५, लातूर आणि कोल्हापूर प्रत्येकी एका उष्माघाताच्या रुग्णाची नोंद झाली.

सर्वाधिक मृत्यू नागपुरात

महाराष्ट्रातील एकूण २९ मृत्यूंपैकी सर्वाधिक १२ मृत्यू नागपुरात, त्यानंतर औरंगाबाद पाच, नाशिक चार, अकोला येथे तीन मृत्यू झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com