Accident News: धुळवडी दिवशीच काळाचा घाला! अंगावरचा रंग काढायला उल्हास नदीत उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Badalapur News : दुपारी दोन ते तीनच्या सुमारास चामटोली गावाजवळील पोद्दार गृह संकुलातील काही मुले धुळवड संपल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेले. मात्र त्यातील एक मुलगा पाण्यात उतरल्यानंतर बुडू लागला, त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी पाण्यात उड्या टाकल्या
Badlapur news
Badlapur newsesakal
Updated on

बदलापूरमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. उल्हास नदीत बुडून दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. धूळवड खेळल्यानंतर चारही जण रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com