Raigad News: वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था, गायकवाड कुटुंबियांची सलग 5 वर्षे सेवा

Ashadhi Ekadashi: पनवेल शिवकर येथून वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रसाद गायकवाड कुटुंबाने वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांची भोजन व्यवस्था केली. हा उपक्रम ते मागील 5 वर्षांपासून राबवत आहेत.
Providing Food to warkari
Providing Food to warkariESakal
Updated on

पाली : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. मात्र प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाला जाता येत नसल्यामुळे अनेकजण वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजार होतात. असाच एक प्रकार पनवेल शिवकर येथे दिसून आला आहे. पनवेल शिवकर येथून वारीसाठी जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांसाठी प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी (ता. 29) एक सामाजिक कार्य व वारकऱ्यांची सेवा म्हणून भोजन व्यवस्था केली. प्रसाद गायकवाड मागील 5 वर्षांपासून हा उपक्रम न चुकता राबवत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com