कोरोनाच्या साथीतही राज्यभरात रोजगाराची सुवर्णसंधी
मुंबई - लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून ठप्प झालेले राज्यातील उद्योगधंदे हळूहळू सुरू होत आहेत. आत्तापर्यंत राज्यातील विविध भागात सुमारे ३० हजारपेक्षा जास्त उद्योगांनी स्वप्रमाणित परवानगी घेतली असली तरी त्यातील १२ हजार उद्योगांची चाके सुरू झाली आहेत. या उद्योगांना कामगारांची कमतरता भासत आहे. आठ लाख कामगारांची गरज असताना जेमतेम दोन लाखांच्या आसपासच कामगार उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या साथीतही राज्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मिळण्याची सुवर्णसंधी आल्याचे उद्योग विभागातील आकडेवारीहून स्पष्ट होते.
इतर उद्योगांनाही सुरुवात
कोरोनाच्या काळात सुरू होणाऱ्या उद्योगांना कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. मात्र स्थानिक कामगार अद्याप जायला तयार नसल्याचे उद्योग विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच परराज्यतील कुशल-अकुशल कामगार आपापल्या राज्यात जाण्याच्या मानसिकतेत आहेत.
उद्योगांची स्थिती
कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या महसूल विभागात कामगारांची कमतरता
पुणे जिल्ह्यामध्ये सव्वादोन लाख कामगारांची गरज असताना केवळ २० हजार कामगार उपलब्ध
इतर जिल्ह्यामध्ये अशीच अवस्था
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे.
कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करता स्वतंत्र वाहनांची सोय करणे.
वाहतुकीसाठी उद्योग विभागाकडून आवश्यक संख्येने वाहनांचे परवाने घेण्याची अट
आत्तापर्यंत पाच हजार वाहनांची आवश्यकता असताना जेमतेम १४ हजार वाहने उपलब्ध झाली आहेत.
मुंबई व महानगर, पनवेल, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आदी रेड झोन परिसरात उद्योग सुरू करण्यास अद्याप मुभा नाही.
भविष्यात या ठिकाणे परवानगी दिल्यावर येथेही मनुष्यबळाची कमतरता जाणवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.