
मुंबई - राज्यातील काही भागांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्या शिक्षकांचे योग्य समायोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थी संख्या कमी झाली तरी कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितले.