

16000 Gram Panchayats Term Ending Protest Announced in State
Esakal
नाशिक, ता. १५ : ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंच किंवा सदस्यांनाच संधी द्यावी, या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेने शुक्रवारी (ता. २०) ग्रामपंचायत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. अधिवेशन काळात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यभर घेऊन जाणार असल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.