ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला; २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ

Grampanchayat election progara declare
Grampanchayat election progara declare

अहमदनगर : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून १८ जानेवारी २०२१ ला मतमोजणी होणार असल्याचे आदेश म्हटले आहे.

राज्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. आता निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सुमारे 14  हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १५ डिसेंबरला तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस जाहीर केली जाणार आहे. तर 23 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला दाखल अर्जाची छाननी होणार आहे. तर ४ जानेवारी 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी 20२१ ला मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com