धर्मगुरुंनी हिजाब प्रकरणाचं भांडवल करू नये - वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilटिम ई सकाळ

Hijab Row : कर्नाटकमधील महाविद्यालयात हिजाब (Hijab) परिधान केलेल्या विद्यार्थीनींना रोखण्यात आल्यानं वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता त्याचे देशभरात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

Dilip Walse Patil
'हिंदू राष्ट्र झाल्यास घरच्या घरी हत्यारं बनवणार'; Jitendra Awhad म्हणाले..

दुसऱ्या राज्यात घडलेल्या एखाद्या घटनेमुळे आपल्या राज्यातील वातावरण बिघडेल असं कुणीही वागू नका असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं. जाती धर्मांमध्ये वाद संघर्ष निर्माण झाल्यास समाजाच्या मनामध्ये दुही निर्माण होईल, त्यामुळे कुणीही आंदोलन करू नये. कोणत्याही राजकीय पक्षांनीही विनाकारण राज्यात अशांतता निर्माण करू नये. सर्व धर्मगुरुंना विनंती आहे की, प्रक्षोभक वक्तव्य करू नये, विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये असं ते म्हणाले.

Dilip Walse Patil
महाआघाडीचं स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात राहील - संजय राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com