मुंबई - ‘काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता बंगळूर व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईपर्यंत पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते का? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.