ट्रॅफिक जाममुळे घटस्फोट? वाचा अमृता फडणवीसांनी दिलेलं स्पष्टीकरण

Amruta Fadnavis News
Amruta Fadnavis News

मुंबई: ट्रॅफिक जाममुळं मुंबईत तीन टक्के घटस्फोट होतात, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं. हे विधान कशाच्या आधारे केलं याचं स्पष्टीकरण आता अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. वाहतूक कोंडींन होणाऱ्या घटस्फोटाच्या विधानावर अमृता फडणवीसांकडून सर्व्हेची माहिती जारी करण्यात आली आहे. 'सर्व्हे मंकी' वेबसाईटनं केलेल्या सर्व्हेचा अमृता फडणवीस यांनी दाखला दिला आहे. (Amruta Fadnavis News)

Amruta Fadnavis News
देशात आमदार-खासदारांविरोधात 5 हजार प्रकरणे प्रलंबित : SC

'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी कोणतंही विधान करते तेंव्हा ते रिपोर्ट्स पाहून करते. सर्व्हे मंकीने एक सर्व्हे केला होता आणि त्यातून त्यांना जे निष्कर्ष मिळाले त्यातून त्यांनी मांडलं होतं की, तीन टक्के घटस्फोट हे या प्रकारामुळे होतात. जसे की, फॅमिलीला वेळ नाही देऊ शकलो. वेळ द्यायची इच्छा होती मात्र, ट्रॅफिक जामसारख्या समस्येत अडकलो. त्यातून फॅमिली लाईफ अफेक्ट होते, त्यामुळे डिव्होर्स होतात, असं हा सर्व्हे सांगतो. त्याचा दाखला देऊन मी ते वक्तव्य केलं होतं. मुंबईसाठी करण्यात आलेला 'सर्व्हे मंकी'कडून हा दावा करण्यात आला आहे. (Amruta Fadnavis Statement on Divorce)

Amruta Fadnavis News
'वारकऱ्यांमध्ये संघ भक्त परायण घुसलेत; दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच'

पुढे त्यांनी म्हटलंय की, नेदरलँड देशातल्या एका सर्व्हेनुसार, जगातील सर्वांत खराब ट्रॅफिक हे मुंबईचं आहे. त्याच्यात 41 हजार कोटीपेक्षा अधिक आपण पैसा वाया घालवतो आहे. एवढा जास्त खर्च कुठेच जगात इतरत्र होत नाही. यावर सोल्यूशन आहे, मात्र ते आजवर अंमलात आलेलं नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com