
कोरोनाच्या फटक्यातून सावरण्यास १५ वर्षे लागतील-‘आरबीआय’च्या अहवालातील अंदाज
मुंबई : कोरोनाच्या दोन वर्षांत अर्थव्यवस्थेला बसलेल्या हादऱ्यातून सावरण्यासाठी आणखीन किमान पंधरा वर्षे लागतील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या २०२२ च्या चलन आणि अर्थविषयक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.सध्याच्या व येत्या काही वर्षांतील संभाव्य विकासदर आणि ‘जीडीपी’ची वाढ ध्यानात घेता, सर्व तोटा भरून निघण्यास सन २०३५ उजाडेल अशी शक्यताही या अहवालात वर्तविली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च’ची मते यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
‘रिव्ह्यू अँड रिकन्स्ट्रक्ट’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. कोरोना नंतरच्या काळात अर्थव्यवस्था सुधारणे आणि विकास दरात वाढ करणे याबाबत यात भाष्य करण्यात आले आहे. २०२०-२१ मधील विकास दर उणे ६.१६ असा राहिला होता. २०२१-२२ मध्ये तो जरी ८.९ एवढा गेला व २०२२-२३ मध्ये तो ७.२ एवढा राहील अशी अपेक्षा आहे. तरीही सर्व तोटा भरून काढायला वर्ष २०३४-३५ उजाडेल असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. भारताचा विकास दर येती काही वर्षे सहा टक्के राहील असा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोनाचा तोटा भरून काढण्यास अनेक वर्षे लागतील असेही बोलले जात आहे.
Web Title: It Will Take 15 Years To Recover From Corona Estimates From Rbi Report Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..