
मुंबई : औरंगाबाद हा मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे, की त्या जिल्ह्यात नऊ आमदार असताना त्यात एकही राष्ट्रवादीचा सदस्य आमदार म्हणून निवडून येऊ शकलेला नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. आज गुरुवारी (ता.दहा) मुंबईत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, प्रयत्न जर मनापासून केले तर यश निश्चित मिळते. मनापासून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ! कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. (Its Sad Not Single NCP Member Elected As MLA, Said Ajit Pawar)
आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काम करावे लागेल. औरंगाबाद (Aurangabad), नांदेड, परभणी, उस्मानाबाद अशा काही जिल्ह्यांमध्ये आम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. पक्ष संघटना मजबूत करावी लागणार आहे. येथून पुढे बेरजेचे राजकारण करावे लागेल. इतर जिल्ह्यातील लोक पक्षामध्ये येऊ इच्छित आहे. गंगापूर-खुलताबाद भागात आपली ताकद वाढली आहे, असे अजित पवार म्हणाले.
यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत
यावेळी गंगापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, गंगापूर नगरपालिकेचे गटनेते सुरेश नेमाडे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, अशोक खाजेकर, मोहसीन चाऊस, माजी नगरसेवक सचिन भवार, हासिफ बागवान यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.