
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आलाय. दरम्यान, आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना कानालाच हात लावला. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली.