Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून यानंतर आता राज्यातील निवडणूकांच्या तयारीला जोर येणार आहे. दरम्यान नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपने तीन राज्यात मोठा विजय मिळवला आहे. यानंतर भाजप हायकमांडने या तीनही राज्यात मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने बड्या चेहऱ्यांना डावललं. या पार्श्वभूमिवर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Politics
Corona Variant JN.1 : चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव; ‘जेएन.१’चा देशातील दुसरा रुग्ण सिंधुदुर्गमध्ये

आव्हाड काय म्हणालेत?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले." असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

"या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले." असा दावा देखील आव्हाडांनी केला आहे.

इतकेच नाही तर आव्हाडांनी पुढे लिहीलं की, ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही."

Maharashtra Politics
Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी, खरगेंनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण; चार हजार संतही राहणार उपस्थित

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या दाव्यावर एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवारांचा गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com