Bharat Rashtra Samithi : KCR यांच्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे? महाराष्ट्रात 'या' तीन नेत्यांच्या नावांची चर्चा

Telangana Rashtra Samithi TRS
Telangana Rashtra Samithi TRSesakal

Bharat Rashtra Samithi: केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची महाराष्ट्रात जबाबदारी कुणाकडे असेल? याविषयी सध्या तर्क लावले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं प्रामुख्यानं समोर येत आहेत.

मागच्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये त्यांची झालेली सभा आणि त्यांनी मांडलेले शेतकऱ्यांचं प्रश्न पाहता महाराष्ट्रात पाय रोवायला ते सज्ज असल्याचं दिसून येत आहे.

Telangana Rashtra Samithi TRS
Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी जाणार? लोकसभा सचिवालयाने धाडली नोटीस

नांदेडमध्ये त्यांनी 'अब कि बार किसान सरकार' अशी घोषणा दिली आहे. सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं.

तर त्यांनी काँग्रेसवरही टीका केली, ते म्हणाले मागील ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच कामे केली नाहीत. आत्तापर्यंत सगळे आमदार-खासदार झाले पण आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल.

हेही वाचाः अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

केसीआर यांना महाराष्ट्रात पाय रोवायचे असतील तर इथल्या मातीतला नेता त्यांना सोबत घ्यावा लागले. त्यासाठी आघाडीवर असलेलं नाव राजू शेट्टी यांचं आहे. त्यांची भेटही झालेली आहे.

त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबतही केसीआर यांची भेट झाली. तर प्रकाश आंबेडकर हे तेलंगणा विधानसभेच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे केसीआर यांना कोण सोबत करणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com