Raigad News: कातकरी महिला मजुरीच्या जंजाळातून मुक्त; स्थलांतराला शोधला अनोखा पर्याय

Katkari Women: रोजगारात घट झाल्याने रोजगारासाठी राज्यात-परराज्यात कातकरी लोकांचे स्थलांतर वाढत आहे. मात्र सुधागड तालुक्यातील कातकरी महिलांनी स्थलांतर थांबवण्यासाठी अनोखा पर्याय शोधला आहे.
Katkari Women migration
Katkari Women migrationESakal
Updated on

पाली : भाताचे कोठार असणाऱ्या रायगड जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र घटत आहे. दुसरीकडे या शाश्वत रोजगारात घट झाल्याने रोजगारासाठी राज्यात-परराज्यात होणारे स्थलांतर वाढत आहे. मात्र सुधागड तालुक्यातील चिखलगाव आदिवासी वाडीतील ‘भवानी बचत गटाच्या’ महिला स्थलांतर थांबवण्यासाठी व आयुष्यभराच्या मजुरीच्या चक्रातून बाहेर पडण्याची धडपड करत स्वतः भातशेती करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शनिवारी (ता. 19) या महिलांनी मिळून भात लावणी केली. यावेळी कृषी अधिकारी देखील शेतात उतरले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com