65-Year-Old Farmer from Latur Ties Himself to Plough : शेतीचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला औताला झुंपवून घेतले आहे. अंबादास गोविंद पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते अशाप्रकारे शेती करत आहेत. एकीकडे आपण भारत कृषीप्रधान देश असल्याचं म्हणतो आहे, पण खर्च परवडत नाही म्हणून शेतकऱ्यावर बैलाऐवजी स्वत:ला जुंपून घेण्याची वेळ आली आहे. या घटनेनं शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे.