

29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सामाजिक पद यात्रा काढण्यात येणार आहे. दीक्षाभूमी ते सेवाग्राम पद यात्रा काढण्यात येणार आहे. मुख्य पदयात्रा देशभरातील 75 लोक करणार असून, इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना निमंत्रित केलं जाणार आहे. 2 ऑक्टोबरला दसरा आहे, संघ यावर्षी मोठ्या प्रमाणात तो साजरा करणार आहे. संविधान आणि लोकतंत्र वाचविण्यासाठी आणि नफरत कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.