जालना, जळगावमध्ये अतिवृष्टी; चाळीसगावात अनेक जनावरे वाहून गेल्याची भीती

.
.

राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता शेवटच्या आठवड्यात मुसळधार कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगावात अनेक नागरिक पुरामध्ये अडकले असून शेकडो जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी मंडळात तब्बल 121.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चाळीसगावातील या गावांना पुराचा वेढा..

तर अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे.चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे, अनेक गावांचा संपर्क तुटला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी काठच्या गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात २ व्यक्ती अडकले असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एसडीआरएफचे पथकबचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.

जालना जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी 603.10 मिलिमीटर आहे. दोन महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी पार झाली असून एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 667.40 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com