- अविनाश साबापुरे
यवतमाळ - अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गृह विभागाने फॉरेन्सिक लॅबमधील विविध पदांची भरती सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्जही केलेत. मात्र महाराष्ट्रातील ही नोकरी मिळविण्यासाठी त्यांना गुजरातमध्ये जाऊनच परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात एकही परीक्षा केंद्र न दिल्याने हजारो उमेदवार या भरतीपासूनच वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.