महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Weather Alert : राज्यात थंडीची लाट कायम, 'या' १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या तुमच्या भागांत कसे असेल हवामान?
Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे.हवामान विभागाने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे थंडीचा सर्वाधिक कडाका जाणवतोय.
Summary
अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान १०°C पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या दोन दिवसांत तापमानात मोठी घट झाली आहे.
पुण्यातील किमान तापमान ८.९°C पर्यंत खाली आले असून पुढील २४ तास थंडी वाढू शकते.
Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट कायम आहे. मागील दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने आज पुन्हा १५ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. आज राज्यातील कोणत्या भागात कसं हवामान राहणार आहे हे जाणून घेऊया.

