
मुंबई : विरोधकांजवळ कुठलीही रणनीती नाही. रेमेडेसिव्हीरच्या प्रकरणामध्ये दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला (maharashtra opposition leader) कलंक लावला. मात्र, आम्ही अजून जाब विचारला नाही. तसेच वाझेच्या प्रकरणामध्ये आलेले बारूत हे नागपूरवरून आले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यावर चर्चा केली नाही. भाजपचंच हे षडयंत्र होतं का? हे तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आम्ही विरोधकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहोत, असं मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी केले. (maharashtra congress president nana patole criticized bjp on waze case)
महाराष्ट्रात गेल्या वेळची कोरोनाची स्थिती बघता अधिवेशन फक्त दोन दिवसांचे घेतले आहे. अधिवेशन ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे ते घेण्यात येत आहे. मात्र, या अधिवेशनात आम्ही केंद्राच्या काळ्या कृषी कायद्याचा निषेध करणार आहोत. तसेच राज्याला स्वतःचा स्वतंत्र कायदा तयार करता येतो. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वतीने अशी मागणी करणार आहोत, की शेतकऱ्यांना पाहिजे तसा कायदा तयार करा. त्यासाठी शेतकऱ्यांचं मत जाणून घ्या, असेही नाना पटोले म्हणाले.
सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतर सर्वांना नाव समजणार. त्यासाठी आम्ही काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मत प्रभारी घेतील. सर्वांचे मत घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही नाना पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीसने राज्यपालांना पत्र दिले. त्याची दखल घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. राज्यपाल हे राजभवनातून भाजपचे कार्यालय चालवितात. आम्ही खूप आधीच अध्यक्षांची निवड करणार होतो. पण, त्या काळात अनेक आमदारांना कोरोना झाला होता. त्यामुळे ते होऊ शकले नाही. मध्यप्रदेशात देखील अनेक दिवस विधानसभा अध्यक्षपद खाली होते. त्यावर कोणी बोलले नाही. आता फक्त आम्ही म्हटल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली, असं भासविण्यासाठी फडणवीसांनी राज्यपालांना पत्र लिहिले, अशी टीकाही पटोले यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्र्यांवर आरोप होत होते. त्यावेळी वकील तरुण परमार यांनी भाजपच्या मंत्र्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सर्वांना क्लीन चीट देत सर्टीफाईड करत होते. ते काही न्यायाधीश नव्हते किंवा ईडीचे अधिकारी नव्हते. त्यामुळे त्यांच्यामागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागत नव्हता. मात्र, आता भाजप विरोधात बसलंय. त्यामुळे ते ईडीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.