Maharashtra Weather Update : महाराष्ट्र अधिकच गारठणार ! पुढील ३ महिने कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Temperature : पुढील तीन महिने राज्यातील कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. उत्तर व मध्य भारतातही थंडीच्या लाटांचा कालावधी ४–५ दिवसांनी अधिक वाढणार आहे. अनेक राज्यांमध्ये ४–५ अतिरिक्त शीतलहरी येण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्र अधिकच गारठणार ! पुढील ३ महिने कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा अंदाज
Updated on

डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यात हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. थंडीचा कडाका वाढला असून यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्र अधिकच गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा महाराष्ट्र अधिकच गारठणार असून, विदर्भ, मराठवाड्यात थंडीच्या लाटा अधिक दिवस टिकून राहण्याचा तिमाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com