Maharashtra Farm Loan Waiver Approved
esakal
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर हिरवा कंदील दाखवला असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.