

Maharashtra Flood Relief
esakal
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील मदत, बचाव व पुनर्वसनासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत (एसडीआरएफ) २११७.८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात महाराष्ट्राला ५०० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार आहे. मॉन्सूनमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागातील मदत आणि बचावकार्यासाठी हा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे. पूरग्रस्त सात राज्यांपैकी हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि नागालँड या राज्यांना २०२६-२७ या वर्षातील ‘एसडीआरएफ’चा