
महाराष्ट्र सरकारने आज विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडले. त्यानंतर ते बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. जनसुरक्षा विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी हे विधेयक सभागृहात मांडले आहे. मात्र आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कायद्यात काय विशेष असणार? या कायद्याची आता गरज का पडली? तर याची सविस्तर उत्तर आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.