

Gram Panchayat State government decision Maharashtra
esakal
Maharashtra Gram Panchayat Administrator Appointment : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे निवडणुका वेळेत घेता आल्या नाहीत, अशा ग्रामपंचायतींवर “प्रशासक” नेमण्याचा महत्त्वपूर्ण आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. दरम्यान प्रशासक म्हणून संरपंच यांनाच राहता येणार आहे.
ग्रामपंचायत मध्ये सरपंचच प्रशासक व सदस्य प्रशासकीय समितीत असणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्राच्या असाधारण भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचा नियमित कारभार खंडित होऊ नये आणि प्रशासन सुरळीत चालावे, यासाठी ही तरतूद लागू करण्यात आली असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.