महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाळी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.