Maharashtra Karnataka Row: कर्नाटकनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं! जतच्या दुष्काळी भागात सोडलं पाणी

जिल्हाधिकारी सध्या या गावांच्या दौऱ्यावर असतानाच कर्नाटकनं ही कृती केली आहे.
Jat Water
Jat Water

जत : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आलेला असताना कर्नाटकनं महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे. (Maharashtra Karnataka Row villages in Jat Taluka got water from Karnataka)

Jat Water
Shashi Tharoor: शशी थरुर अध्यक्ष बनले तर काय होतील काँग्रेसमध्ये बदल?

म्हैसाळ पाणी योजनेचा अहवाल तात्काळ जाहीर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी आज सकाळपासून उमदी भागात पाहणी करत आहेत.

आज नेमके जिल्हाधिकारी त्या भागात असतानाच कर्नाटकनं तुबची बबलेश्वरची योजनेमध्ये पाणी सोडलं आहे. या योजनेतून सोडलेलं पाणी कर्नाटकातील गावांनाच जातं. पण ते सीमावर्ती भागातील तिकोंडी तलावातून पुढे जातं. काल संध्याकाळी पाणी सोडल्यानंतर आज दुपारपर्यंत हा तलाव भरला असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

दरम्यान, कर्नाटकनं पाणी सोडल्यानं तिकोंडी तलावर भरल्यानं हे पाणी जत तालुक्यातील गावांमधून पुढे गेलेलं आहे. पण नेमकं जिल्हाधिकारी या भागात दौऱ्यावर असताना आणि गेल्याकाही दिवसांपासून सीमाभागाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना कर्नाटककडून हा डिवचण्याचा प्रकार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com