राज्यात नवीन मद्य विक्री परवाने वितरणावरून विरोधक सरकारवर तुटून पडत असतानाच आता सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्ला चढवलाय.
लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय त्याचं स्वागत आहे पण त्यासाठी नवीन दारू विक्री परवाने देण्याची गरज नाही. एखाद्या महिन्यात पैसे नाही दिलेत तरी बहिणी रागावणार नाहीत पण त्यांचे संसार उद्धवस्त करू नका अशी विनंती त्यांनी केलीय.
1972 नंतर मद्य विक्री परवाने दिलेले नाहीत मग आताच का देताय असा सवाल तृप्ती देसाई यांनी सरकारला केलाय.