परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट केले की, "भारताने अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांसाठी मदत हवाई मार्गाने काबूलला पोहोचवली. ब्लँकेट, तंबू, स्वच्छता किट, पाणी साठवण टाक्या, जनरेटर, स्वयंपाकघरातील भांडी, पोर्टेबल वॉटर प्युरिफायर, स्लीपिंग बॅग, आवश्यक औषधे, व्हीलचेअर, हँड सॅनिटायझर, पाणी शुद्धीकरण गोळ्या, ओआरएस सोल्यूशन्स आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तूंसह २१ टन मदत साहित्य आज विमानाने पोहोचवण्यात आले. भारत तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवत राहील आणि येत्या काळात अधिक मानवतावादी मदत पाठवेल." असे जयशंकर यांनी म्हटले आहे.