महिलांना स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर बनवणे हीच सक्षमीकरणाची व्याख्या आहे. महिला अपात्र असतानाही पंधराशे रुपयांच्या बदल्यात त्यांची मते विकत घेऊन किंवा चोरून सरकार स्थापन करणे ही त्या महिलांची व राज्याची फसवणूक आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
धाराशिव च्या तुळजापूर मधील पिता पुञाची अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला आरोपींनी अधिक पैशाचे आमिष दाखवले.एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअॅपने पाठवली या लिंक द्वारे पिता पुञाची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची अॉनलाईन फसवणूक करण्यात आली
कल्याण शीळ रोडवर गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री अचानक मोठा दिशा दर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती.दरम्यान घटनास्थळी मनसे नेते राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहचले आणि पोलीस, फायब्रिगेड यांना बोलवून घेऊन पडलेला फलक बाजूला काढला.. दरम्यान या घटनेत एक बाइक स्वार जखमी होता होता वाचला..
- नागपूर सहित विदर्भातील काही भागात बुधवारी पावसाचा अंदाज
- मंगळवार ते बुधवार दरम्यान नागपूर सह विदर्भात पावसाचा अंदाज
- मंगळवारी नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट
- तर बुधवारी या पाच जिल्ह्यांसह अमरावती, वर्धा अशा सात जिल्ह्यांना येलो अलर्ट
- तर गुरुवारी संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय...
- जात पडताळणी दरम्यान एकदा 'व्हिजिलन्स सेल'ने स्वातंत्र्यपूर्व काळातील दस्तऐवजांची वैधता मान्य केल्यावर पुनर्पडताळणीस आदेश देता कामा नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.
- अमरावती येथील जातवैधता समितीच्या आदेशा विरोधात दाखल प्रकरणात सुनावणी दरम्यान निकाल..
- याचिकाकर्त्यांनी १९३२ सालच्या कोतवाल पुस्तकातील नोंद सादर केली होती...त्यात २ मे २०१९च्या पहिल्या व्हिजिलन्स सेल अहवालात नोंद पडताळून खरेपणा मान्य केला
- मात्र, समितीने कोणतेही कारण न नोंदवता दुसऱ्या पडताळणीत नोंद फेटाळण्यात आली.
- जातपडताळणी समितीचेकार्य फक्त अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यापुरतेच मर्यादित आहे. समिती स्वतःहून पुरावे जमा करून दावा सिद्ध किंवा खोडून काढू शकत नाही.
- २००३च्या नियमांनुसार, समिती अर्जदाराने दिलेल्या पुराव्यांवर असमाधानी असल्यासच प्रकरण 'व्हिजिलन्स सेल'ला पाठवता येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सीएनजी वाहनांच्या ‘हायड्रो टेस्टिंग’चे शुल्क वितरकांनी अचानक वाढवून २,८०० ते ३,००० रुपये केले आहे.
काही महिन्यांपूर्वी हेच शुल्क फक्त ५०० ते ७०० रुपये होते. या प्रचंड वाढीमुळे खासगी वाहनधारक आणि रिक्षाचालकांवर आर्थिक ताण आला आहे
.
रिक्षा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दर तीन वर्षांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या या तपासणीच्या दरवाढीवर सरकारने तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाढलेला खर्च रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ करून प्रवाशांवर टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तुळजापुर मधील पिता पुञाची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलीय. बनावट लिंक पाठवुन धाराशिव च्या तुळजापूर मधील पिता पुञाची अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला आरोपींनी अधिक पैशाचे आमिष दाखवले.एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअॅपने पाठवली या लिंकद्वारे पिता पुञाची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची अॉनलाईन फसवणूक करण्यात आली.
पोळ्याच्या सणात ग्रामीण भागात जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. लाखनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या केसलवाडा वाघ या गावात एका ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाई 7 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 6 मोबाईल, 4 दुचाकी, रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी जप्त केला.
राज्यातील काही जिल्ह्यातच 29 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि उत्तर महष्ट्रात तुलनेत पाऊस खूप कमी झाला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे. बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना समावेश आहे.
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.