तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार हे निश्चित

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १३ दिवस उलटून गेले तरी भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राज्यात सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, उद्या संध्याकाळपर्यंत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येत्या ९ नोव्हेंबर रोजी विद्यमान विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. मात्र सत्तेचा दावा करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना भाजपने अद्यापही सत्तेचा दावा केलेला नाही. उद्या संध्याकाळपर्यंत सत्तेचा दावा होणं अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी यांना सल्लामसलतीसाठी राजभवनावर बोलावलं होतं. कुंभकोनी राजभवनावर पोहोचले असून राज्यपालांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आहे.

दरम्यान, आज दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं. या शिष्टमंडळाने राज्यपालांशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. विशेष म्हणजे सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपच्या या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सत्तेचा दावा केलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com