

esakal
महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या कोकण, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, किनारपट्टी आणि घाटमाथ्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या पुणे आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.