Eknath Shinde On Upcoming Election Victory : आगामी काळात राज्यात विविध महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याआधा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केले आहे.
हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'
यासाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चो बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकांच्या विजयाबाबत मोठं विधान केले आहे.
शिंदे म्हणाले की, निवडणूक कुठलीही असो योग्य नियोजन असणं फार महत्त्वाचे असून, निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.
आज कोणत्याही कार्यक्रमालाआम्ही जातो तिथे प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित असतो. सहा महिन्यांपूर्वी राज्यात आपण सत्ता परिवर्तन केल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचं सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. अतिवृष्टीच्या काळात आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली. हे केवळ सर्व सामान्य लोकांच्या मनातलं सरकार असल्यामुळे शक्य झाले आहे.
आमच्या सरकारने निकषांमध्ये न बसणारेही निर्णय घेतल्याचे शिंदें यावेळी म्हणाले. यामागे केवळ सर्व सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हिच भूमिका होती. लोकांच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण झाला आहे की, हे सरकार काम करणारं आणि न्याय देणारं सरकार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.