Maharashtra Politics: नवा वाद; शिवराय आग्र्यामधून बाहेर पडले तसेच शिंदे...

Eknath Shinde mumbai
Eknath Shinde mumbaiesakal

शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेल पडले असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (maharashtra politics new controversy chhatrapati shivaji maharaj Eknath Shinde Mangal Prabhat Lodha )

प्रतापगड किल्ल्यावर आज 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या इतिहासातील एका घटनेशी तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. ज्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Eknath Shinde mumbai
Aditya Thackeray : एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागं पडतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

काय म्हणाले लोढा?

जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

राज्यात आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापलं आहे. अशातच आता लोढा यांनी केलेलं वक्तव्य राज्यात नव्या वादाचं कारण ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com