Maharashtra Education : प्राध्यापक भरतीचा गुंता अखेर सुटला; आता ‘६०+४०’चे सूत्र निश्चित!

Professor Recruitment : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यापूर्वी लागू असलेल्या ‘८०+२०’ गुणसूत्राऐवजी ‘६०+४०’ या नव्या मूल्यांकन पद्धतीला राज्यपाल व कुलपतींची मंजुरी.
Professor recruitment deadlock ends in Maharashtra as universities adopt the 60+40 selection formula,

Professor recruitment deadlock ends in Maharashtra as universities adopt the 60+40 selection formula,

sakal

Updated on

नागपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयातील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा गुंता अखेर सुटला आहे. राज्यपाल आणि कुलपतींनी यापूर्वीच्या ‘८०+२०’च्या गुणाच्या सूत्राऐवजी ‘६०+४०’ गुणांच्या नव्या सूत्राला मान्यता दिली असून त्यामुळे राज्यात रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. महाविद्यालयस्तरावर वरिष्ठ प्राध्यापक पदांच्या पाच हजार ११२ जागांना वित्त विभागाने मान्यता दिल्याने राज्यात मोठी भरती होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com