

Monsoon Winds Change
esakal
Rainfall Forecast Maharashtra : पुढील चार आठवड्यांत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचा जोर ओसरत असतानाच आता पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज (ता. २१) मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.