

Increased electricity bills after installation of smart meters
esakal
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि पूर्वसूचनेशिवाय बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट ते तिप्पट झाल्याच्या तक्रारींनी राज्यभर खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पालघर परिसरात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले असून, महावितरणच्या 'हुकूमशाही' कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.