मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. केवळ एका दशकात भारताने जगातील अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे..विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले..देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात फडणवीस यांच्या हस्ते ध्वजराेहणाचा शासकीय सोहळा पार पडला. या वेळी ते म्हणाले, ‘भारत सध्या विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहे. देशाची विकासगाथा कोणीही थांबवू शकत नाही. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी स्टार्टअप्स, तंत्रज्ञानासह इतर गोष्टी समर्थपणे उभाराव्या लागतील.’.ते म्हणाले, ‘शक्य तिथे स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकट करावे लागणार आहे. भारतातील एकूण परदेशी गुंवतणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारानिर्मिती होत आहे..वस्तुनिर्माण, आयात-निर्यात, स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेत योगदान देईल.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.