sugar production
sakal
पुणे - राज्यातील साखर गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून बहुतांश कारखान्यांमध्ये ऊस पुरवठा कमी होऊ लागला आहे. आत्तापर्यंत राज्यात ९१८ लाख टन उसाचे गाळप होऊन ८५६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपात पुणे जिल्हा आघाडीवर असून साखर उत्पादनात कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले आहे. लवकरच काही कारखाने गाळप बंद करण्याची शक्यता आहे.