Maharashtra-Telangana Border Dispute
esakal
सुग्रीव गोतावळे
जिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून एकाचवेळी जनगणना सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. यात एकाच व्यक्तीची नावे दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत नोंदवली जाण्याची शक्यता आहे. जिवती तालुक्यातील परमडोली, तांडा, कोठा, मुकादमगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, अंतापूर, येसापूर, नारायणगुडा, भोलापठार आणि लेंडीगुडा या १४ गावांमध्ये तेलंगण सरकारने मंगळवारपासून जनगणना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारही या गावांत स्वतंत्र जनगणना घेणार असल्याचे समजते.