
Election Commission
Sakal
पांडुरंग म्हस्के
मुंबई : महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांनी राज्यातील मतदारांच्या नावांच्या दुबार नोंदी झाल्याचा आरोप केल्यानंतर नावांचा शोध घेऊन संबंधित मतदाराला कोणत्या मतदारसंघातून मतदान करायचे आहे, याबद्दल संमतिपत्र घेऊन दुबार मतदान रोखण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. अशी दुबार नावे शोधण्याचे आदेश सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे समजते.