
मुसळधार पावसानानंतर आता राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला. अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे उकाडा वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीही येत्या २ ते ३ दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.